प्रतिनिधी-शैलेश तांबडा
✅ खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा
महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक प्रादेशिक कार्यालय, जव्हार अंतर्गत आधारभूत किमतीवर खरेदी योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन आणि पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात येत असून, त्यामुळे त्यांना सहज व जलद सेवा मिळत आहे.शेतकऱ्यांनी नोंदणी व खरेदी प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी www.mahatdc.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
जिल्हानिहाय खरेदीचा आढावा:
✔ पालघर जिल्हा:
▪ १०,४६० शेतकरी लाभार्थी
▪ २ लाख ७१ हजार क्विंटल धान्य खरेदी
▪ ६२ कोटी ४१ लाख १२ हजार ५९० रुपये वितरीत
✔ ठाणे जिल्हा:
▪ ५,५३३ शेतकरी लाभार्थी
▪ १ लाख २५ हजार क्विंटल धान्य खरेदी
▪ २८ कोटी ८२ लाख १० हजार २४० रुपये वितरीत
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना:
✔ कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करावी.
✔ धान्य खरेदीची रक्कम वेळेवर मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
➡ लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ, नाशिक.

