प्रतिनिधी -शैलेश तांबडा
डहाणू तालुक्यातील मौजे गोवणे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागांतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (पाणलोट विकास घटक 2.0) अंतर्गत वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा उद्देश लोकसहभागातून मृद व जलसंधारणाची जनजागृती करून शाश्वत विकास साधणे हा होता.या कार्यक्रमास आमदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित, प्रमुख पाहुणे अँड. निलेश राऊत, युएआ अध्यक्ष अँड. विराज गडग, गोवणे गाव सरपंच अलका घोडा, उपसरपंच संदीप ठाकरे, ग्रामसेविका रजनी शेलार, आदिवासी धारणा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सचिव तथा डेहणे सरपंच दत्तात्रय भोंडवा, निकणे उपसरपंच तथा कंपनीचे उपाध्यक्ष सुदाम मेरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम, दशरथ गहला, हेमेंद्र पाटील, बारक्या वायेडा, महादू तांबडा, आणि कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी उमेश पवार, जगदीश पाटील, तसेच कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक सचिन कामडी, सचिन नाठे, रेजिना राबड, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पावबाके सर, शिक्षक वृंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.या यात्रेच्या माध्यमातून गावकऱ्यांना मृद व जलसंधारणाच्या महत्त्वाची सखोल माहिती देण्यात आली. शेतीसाठी जलसंधारणाचे महत्त्व, शेततळ्यांची गरज आणि त्याचा उपयोग यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बांधलेल्या शेततळ्यांची पाहणी केली.यावेळी अँड. विराज गडग, अँड. निलेश राऊत आणि सरपंच दत्तात्रय भोंडवा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी जलसंधारणाच्या गरजेवर आणि त्यासाठी होणाऱ्या योजनांवर प्रकाश टाकला. जलसंधारणाच्या उपाययोजनांचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये जलसंधारणाविषयी जागरूकता वाढून शेतीच्या उत्पादनात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

