कधी हिरवी शाल पांघरलेली, आज वाळवंट भासते,
नदीच्या लाटा हसत होत्या आता पाणी आक्रोश करते…
डोंगर होते गर्द जंगलाने, पक्ष्यांचे घरटे होते,
आज तिथे धूरच धूर उरले काहीच नव्हते…
झाडे कापली, झरे आटले, पाऊसही रुसून गेला,
गाव सुने, शेत वाळले, माणूसच निसर्गाचा शत्रू ठरला…
शहरांच्या उंच इमारती, पण हवा दमट-सासलेली,
गर्दीत हरवले ससे, हरणे, मोकळे शिवार जळलेली…
निसर्ग ओरडतोय, ऐकतो का कोणी? स्वतःच्या विनाशाचा, कोणी घेतोय का गंध ?
वारा सांगतो कथा, झाडे वाहतात अश्रू, माणसाला सगळे कळले, पण त्याचे दरवाजे बंद…
अजून वेळ गेली नाही, पाणी जपू, झाडे लावू,
पुन्हा एकदा या अथांग वाळवंटाला हिरवळ बनवू…
फुलतील पुन्हा रानफुले, मधुघट गंध दरवळेल,
पाखरे पुन्हा गातील गाणी, नभात इंद्रधनू चमकेल.
डोंगरांना येईल हिरवा साज, नद्यांचे पाणी नाचेल,
आपल्या निसर्गाच्या कुशीत, सुखाचे पीक बहरेल…
✍️लेखक - अज्ञात....सूचक-सूर्यकांत गावित
