दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू, भारतीय जनता पक्षाच्या “गाव-वस्ती संपर्क अभियान 2025” अंतर्गत डहाणू तालुक्यातील कासा मंडळात विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष भरतभाई रजपूत यांच्या सूचनेनुसार हे अभियान राबविण्यात आले.
दि. 26 व 27 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कासा व वरोती येथे मंडळ अध्यक्ष ॲड. आशिष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सुनिता कामडी, ग्राम सदस्य, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसर स्वच्छता, चौकसभा, लाभार्थी संपर्क, बुध समिती बैठक, पदयात्रा व वाहनफेरी अशा उपक्रमांनी गावात जनजागृती करण्यात आली.

रविवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम घारपुरे उपाहारगृह, कासा येथे नागरिकांच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या ऐकवण्यात आला.
दि. 29 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता बूथ समिती बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर कासा गावात पदयात्रा व वाहनफेरी झाली. यानंतर संघाचे ज्येष्ठ सेवक जनार्दन विठ्ठल घारपुरे व त्यांच्या पत्नी सुनंदा घारपुरे यांचा मंडळ अध्यक्ष ॲड. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सायंकाळी श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन साईभक्तांशी संवाद साधण्यात आला.

यानंतर आदिवासी सेवक व ज्येष्ठ नागरिक मा. आप्पाजी भोये यांचा भाजप नेते सुरेश शिंदा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कासा उपजिल्हा रुग्णालयात भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आरोग्य विषयक चर्चा केली.यानंतर कासा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुनिता किरण कामडी यांचा भाजप जिल्हा सरचिटणीस जयू डोंगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दि. 30 एप्रिल रोजी वरोती गावातील सूर्या नदीकाठी चौकसभा पार पडली. त्यानंतर रात्री वस्तीमध्ये भजनाचा कार्यक्रम झाला.
या अभियानामध्ये शैलेश घारपुरे, सुनीता घारपुरे, जयू डोंगरकर, सुरेश शिंदा, भरत परिहार, सुरेश दांडेकर, जानी वरठा, भरत प्रजापती आदी मान्यवर व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा -9834756487
