दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ डहाणू :आसवे पाटीलपाड्यात वादळात झाड कोसळून वीज खंडित; ग्रामस्थांचे श्रमदानातून मार्गमुक्ती : आसवे पाटीलपाडा येथे मंगळवारी रात्री १०.३० वाजता झालेल्या अवकाळी पावसात वाऱ्याच्या जोरामुळे खजूरीचे झाड मोडून विद्युत वाहिनीवर कोसळले. त्यामुळे त्या भागातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाला. लाईन बंद असल्यामुळे रस्त्यात वायर करंट नसल्यामुळे एका दुचाकीचा अपघात झाला, त्याचा मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

झाड आणि विद्युत तार मेन रस्त्यावर आडवी पडल्यामुळे मार्ग बंद झाला होता. या परिस्थितीत गावातील तरुणांनी तात्काळ पुढाकार घेत अन्वर अन्सारी यांच्या माध्यमातून जेसीबी आणून झाड व केबल बाजूला करून रस्ता मोकळा केला.
लाईन तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित:
मंगळवारपासून वीजपुरवठा बंद असून, त्यामागील मुख्य कारण झाड विद्युत तारांवर पडून वायर तुटल्याचे समजते. यामुळे संपूर्ण परिसर अंधारात गेला.

गावकऱ्यांची मदतीला धाव:
विजेच्या दुरुस्तीसाठी आलेल्या वायरमन कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी सहकार्य केले. पाटीलपाड्यातील युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन वायर खेचण्यासाठी मदत केली. “विजेची गरज आम्हा सर्वांना आहे, त्यामुळे आम्हीच मदतीला पुढे आलो,” असे स्थानिक युवकांनी सांगितले.

गावच्या नेतृत्वाने घेतली पुढाकार:
या श्रमदानात ग्रामपंचायत सरपंच विष्णू गुरोडा, सदस्य संतोष काकड, महेश कडू, अनिल चौधरी, अमित काकड, मनोज तरे, मंगेश कडू, अन्वर अन्सारी, रामा कडू, विशाल बारगा, अभिजीत बारगा, ऋतिक सुमडा, रोशन घाटाळ यांचा सक्रिय सहभाग होता.या सामूहिक प्रयत्नामुळे रस्ता मोकळा झाला असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीचे हे उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे.
