पालघर,रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी आदिवासी कोळी मल्हार समाजाचे भव्य महासंमेलन माजी आमदार महादेव घाटाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात आणि पारंपरिक थाटात पार पडले.
या संमेलनाचे उद्घाटन पारंपरिक आदिवासी पद्धतीने करण्यात आले. यावेळी बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार विलास तरे, माजी आमदार राजेश पाटील, तसेच दिनेश तारवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहन गुहे यांनी केले. यानंतर मंचावर उपस्थित विलास बेलकर, तुकाराम घाटाळ, सुनील झळके व अंकुश देसले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्यावर सर्वांनी भर दिला.
महासंमेलनात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील महासंमेलनाचे यजमानपद डहाणू तालुक्याला देण्यात आले आहे.
कार्यक्रमाला संजय भुयाळ, सुधीर भोईर, एड.सुनंदा बेलकर, माजी सभापती स्नेहलता सातवी, नीता काटकर, रमेश कुंभारे, सीताराम माळी, गंगाराम वारंगडे, गुरुनाथ लहानगे, प्रकाश वरखंडा, राजू दळवी, कृष्णा जाधव, रामदास हरवटे, अविनाश मातेरा, सुनील गायकवाड, अरुण कदम, शिवाजी भोवरे, रज्जू सातवी,पत्रकार निलेश कासट, माधव तल्हा सह आदी. मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन चंद्रकांत घाटाळ व नितीन बोंबडे यांनी केले.
कोट-
“कोळी मल्हार समाज एक आहे, हे दाखवण्यासाठी असे संमेलने अत्यंत गरजेचे आहेत. आपल्या देवी-देवतांची माहिती, बोलीभाषा, जात प्रमाणपत्रे आणि सांस्कृतिक ठेवा यांचे दस्तावेजीकरण करणे काळाची गरज आहे. राज्यस्तरीय समितीची स्थापना करून समाजहितासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.”
महादेव घाटाळ अध्यक्ष तथा माजी आमदार
कोट-
“अस्मिता आणि संस्कृती जागवणारी अशी संमेलने समाजाला दिशा देतात. तरुण पिढीने या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे.”
विलास तरे आमदार
कोट-
“‘मल्हार कोळी’ नव्हे तर ‘कोळी मल्हार’ या नावानेच समाजाची ओळख प्रस्थापित झाली पाहिजे. समाजाची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असून, त्याचे अस्तित्व रेकॉर्डवर यायला हवे. वाद्यसंस्कृती, बोलीभाषा, गीतांचा संग्रह आणि देवदेवतांचा सांस्कृतिक ठेवा जतन करणे महत्त्वाचे आहे. वर्गणीचा हिशोब पारदर्शक असावा व आर्थिक शिस्तीचा आदर्श निर्माण करावा.”
राजेश पाटील माजी आमदार
